उत्साही चेहरा
तरुण नेतृत्व
स्वाभिमानी वाटचाल !
मी आपल्यातीलच एक युवक असून, गेल्या 20-25 वर्षांपासून स्वाभिमान मित्र मंडळाच्या तर्फे सदैव समाजहिताचे कार्य करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आलो आहे. जनतेच्या प्रश्नांना आवाज देणे, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम राबवणे आणि सामान्य माणसाचा स्वाभिमान जपणे हेच माझ्या कार्याचे खरे ध्येय आहे. या प्रवासात आपल्या विश्वासानेच मला सतत बळ मिळाले आहे आणि त्या विश्वासाला जागण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहिलो आहे.
स्वाभिमान मित्र मंडळाच्या तर्फे सदैव समाजासाठी जगण्याचा आणि समाजहिताचे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यासाठी समाजकारण ही केवळ जबाबदारी नसून, ती माझ्या आयुष्याचा श्वास आहे. गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असा भेद न करता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे, गरजूंच्या डोळ्यातील अश्रू पुसणे आणि सामान्य माणसाचा स्वाभिमान जपणे — हेच माझ्या कार्याचे खरे समाधान आहे.
समाजातील युवकांना दिशा देणे, महिलांना आधार देणे, वृद्धांना साथ देणे आणि मुलांना भविष्याची आशा देणे हे माझे खरे ध्येय आहे. मला विश्वास आहे की एकत्रितपणे आपण समाजाचे रूपांतर घडवू शकतो आणि पुढच्या पिढ्यांसाठी उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतो.मी समाजभिमुख व समाजहिताचे विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. समाजातील प्रत्येक घटकाची समस्या समजून घेऊन, तिच्यावर योग्य तो उपाय शोधणे हे माझ्या कार्याचे मूळ ध्येय आहे.
शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, क्रीडा, महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी आणि स्थानिक विकास या सर्व क्षेत्रांमध्ये मी सातत्याने कार्यरत आहे.
यामुळेच स्वाभिमान मित्र मंडळ आज सामान्य नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरले आहे.
“सामाजिक कार्य हे केवळ जबाबदारी नसून, ती एक आयुष्यभराची बांधिलकी आहे.”
याच ध्येयाने प्रेरित होऊन मी नेहमीच लोकांसाठी, लोकांसोबत उभा राहण्याचा संकल्प केला आहे.
मी अजय आनंदा बल्लाळ, “लोकांसाठी लोकांसोबत”


व्हिडिओ







